Home शिरूरमहाराष्ट्र आयुक्त यांनी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध विभागांची केली पाहणी; कचरा व्यवस्थापन व आरोग्य सेवांचा घेतला आढावा

आयुक्त यांनी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध विभागांची केली पाहणी; कचरा व्यवस्थापन व आरोग्य सेवांचा घेतला आढावा

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आयुक्त यांनी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध विभागांची केली पाहणी; कचरा व्यवस्थापन व आरोग्य सेवांचा घेतला आढावा

पिंपरी, (दिनांक १८ मार्च २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी आज सकाळी दुर्गादेवी टेकडीसह शहरातील विविध भागांची पाहणी करत स्वच्छता आणि आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला.कुदळवाडी, चिखली, पुनावळे, तळवडे, रुपीनगर आणि त्रिवेणी नगर या परिसरांमध्ये प्रत्यक्ष भेट देत त्यांनी कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची स्वच्छता तसेच नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची स्थिती तपासली.

दुर्गा देवी टेकडी परिसराची पाहणी करताना आयुक्त यांनी तेथील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुविधांची स्थिती तपासली. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही त्यांनी पाहणी केली. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, देखभाल आणि नागरिकांसाठी स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

दुर्गादेवी टेकडी हे ठिकाण शहराच्या वैभवात भर घालणारे ठिकाण असून अनेक नागरिक तेथे भेट देत असतात, त्यामुळे याठिकाणी नागरिकांना पर्याप्त सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत. याठिकाणी विविध प्रकारच्या वनस्पती आणि वृक्षांच्या प्रजातीही पाहायला मिळत असल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याबाबत देखील त्यांनी सूचना केल्या. शिवाय, त्यांनी तेथील नागरिकांशीही संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.

banner

याशिवाय त्यांनी सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तसेच निगडी येथील यमुनानगर आरोग्य कार्यालयाला भेट देत तेथील कामकाजाचा आढावा घेतला आणि कार्यालयातील दैनंदिन हजेरी नोंदवह्या तपासल्या. तसेच, सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेचे काटेकोर पालन करावे आणि नागरिकांना सेवा देताना कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आरोग्याधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक रामचंद्र शिंगाडे, सहाय्यक आरोग्य निरीक्षक रवी रोकडे, आरोग्य मुकादम मल्लिकार्जुन कुरवार आदी कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. सूर्यवंशी यांनी वॉर्डस्तरीय कामकाजाबाबत देखील सविस्तर माहिती घेतली. कचरा संकलनाची नियमितता, आरोग्य पथकांची उपस्थिती, तसेच क्षेत्रातील स्वच्छतेची अंमलबजावणी याबाबत कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन कामाची गुणवत्ता उंचावण्यावर भर देण्याबाबत सूचना केल्या.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?