Home शिरूरमहाराष्ट्र गुढीपाडवा पट वाढवा” अभियानाचा म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळेतून महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

गुढीपाडवा पट वाढवा” अभियानाचा म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळेतून महापौर व आयुक्त यांच्या उपस्थितीत होणार शुभारंभ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी दि. १८ मार्च २०२६: राज्य शासनाच्या धोरणानुसार शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या (पट) वाढवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या राज्यस्तरीय विशेष अभियानाचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात उद्या, दि. १९ मार्च २०२६ रोजी महापौर रवि लांडगे व आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते होणार आहे. हा कार्यक्रम म्हेत्रेवाडी प्राथमिक शाळा येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर,शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच स नगरसदस्य,नगरसदस्या उपस्थित राहणार आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.‘गुढीपाडवा पट वाढवा’ या अभियानाच्या माध्यमातून इयत्ता पहिलीसह पुढील सर्व वर्गांमध्ये प्रवेश वाढवणे, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.
सध्या इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळावी,यासाठी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून पालकांमध्ये महानगरपालिका शाळांबाबत सकारात्मक विश्वास निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

या अभियानाच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवून सर्वसमावेशक आणि दर्जेदार शिक्षण व्यवस्था अधिक बळकट करण्याचा महापालिकेचा मानस आहे.

banner

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू होणारे हे अभियान शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?