Home शिरूरमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

स्वच्छतेसोबत सौंदर्याला मिळतोय नवा आयाम

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी, (दिनांक २० मार्च २०२६) जागतिक पुनर्वापर दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांसाठी ‘वेस्ट टू वंडर’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल व सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांच्या अधिपत्याखाली आरोग्य विभागामार्फत ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.

महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत ३२ प्रभागांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, शहर स्वच्छतेवर भर देतानाच वस्तूंचा सुयोग्य पुनर्वापर करून कलात्मकता जोपासण्याचा दुहेरी उद्देश या उपक्रमामागे आहे. टाकाऊ वस्तूंना नवसंजीवनी देत स्वच्छतेसोबत सौंदर्याची अनोखी सांगड घालण्याचा प्रयत्न यामधून करण्यात येत आहे.

या स्पर्धेमुळे संपूर्ण शहरात स्वच्छते बरोबर कलेचा आकर्षक व सर्जनशील आविष्कार पाहायला मिळणार आहे. प्रत्येक प्रभागातून टाकाऊ वस्तूंचे रूपांतर कल्पक कलाकृतींमध्ये करून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला जाणार आहे.

banner

स्पर्धे अंतर्गत कचरा संवेदनशील ठिकाणांचे नाविन्यपूर्ण व आकर्षक रूपांतर करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात सौंदर्यीकरण होऊन नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे आवश्यक असून, नोंदणीची अंतिम मुदत २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.

*लिंक* https://forms.gle/LsxTPH6axEaak4LW7⁠�

वेस्ट टू वंडर हा विभागाचा हा उपक्रम शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि वसुंधरापूरक जीवनशैलीस चालना देणारा ठरेल, असा विश्वास सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे यांनी व्यक्त केला.

वेस्ट टू वंडर स्पर्धेमुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबरोबरच सर्जनशीलतेची जाणीव निर्माण होईल. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून शहर अधिक सुंदर आणि वसुंधरापूरक बनविण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

वेस्ट टू वंडर हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून, नागरिकांमध्ये वसुंधरापूरक सवयी रुजविण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर याबाबत जनजागृती वाढवून शहर अधिक स्वच्छ व शाश्वत करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठ

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?