Home आरोग्य औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

औंध जिल्हा रुग्णालयातील पदोन्नतीचा प्रश्न रखडला?; कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पुणे प्रतिनिधी (दिनांक१ ऑगस्ट २०२६) जिल्हा रुग्णालय, औंध येथील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव अद्याप वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या नियमानुसार पात्र कर्मचाऱ्यांना वेळेत पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना देखील प्रक्रिया विनाकारण रखडवली जात आहे. पदोन्नतीचा प्रस्ताव जाणूनबुजून वरिष्ठांकडे पाठवला जात नसल्याचा आरोप काही कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाहक्कांवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, संबंधित कायदेशीर तरतुदींचे पालन होत आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात शासनाने मंजूर केलेल्या पदांप्रमाणे अनेक कर्मचारी प्रत्यक्षात कार्यरत नसून, त्यांच्याकडून इतरच स्वरूपाची कामे करून घेतली जात असल्याची चर्चा आहे. योग्य पदावर योग्य कर्मचारी नसल्यामुळे प्रशासकीय समन्वयावर परिणाम होत असताना दिसत आहे त्याचा फटका रुग्णसेवेलाही बसत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळण्यात अडचणी येत असल्याची माहितीही समोर आली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनात काही सकारात्मक बदल घडल्याचे कर्मचारी मान्य करतात. अनेक बाबींमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला पदोन्नतीचा प्रस्ताव अद्याप वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला नसल्याने नाराजी कायम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

banner

पात्र कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी तसेच शासनाने मंजूर केलेल्या पदांनुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व कामकाजाची पुनर्रचना करावी, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles