by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या शिलेदारांनी भीम अनुयायांची केली अन्न पाणी सेवा.

आमदार शंकर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित

| प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड, (दिनांक १४ एप्रिल २०२६ ) पिंपरी चिंचवड शहरात आज पिंपरी येथे महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर पिंपरी चौकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना आज दिनांक १४; एप्रिल पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या अन्न पाणी वाटपात उपस्थित पत्रकारांनी भीम अनुयायांची सेवा केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे तसेच डिजिटल मिडिया परिषदेचे शहर अध्यक्ष विनय सोनवणे यांनी आयोजनामध्ये मोलाचे योगदान दिले. अन्न पाणी सेवा सुरू असताना दरम्यान आमदार शंकर जगताप, माजी आमदार गौतम चाबुकस्वार , भाजप शहराध्यक्ष शत्रुग्न काटे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शिवसेना नेते युवराज कोकाटे, कैलास कुटे, दीपक नागरगोजे यांच्यासह विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून भीम अनुयायांना अन्न व पाणी वाटप करून शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भीम सृष्टी येथील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी आणि नागरिक येत असतात. त्यांच्या अन्न पाण्याची आणि अल्पोपहराची सोय व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषदेच्या वतीने अन्नपाणी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भीम अनुयायांसह उपस्थित पत्रकारांमध्ये उत्साहाचे वातावर दिसले. तत्पूर्वी विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पत्रकारांनी अभिवादन केले.
यावेळी आयोजक पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी, डिजिटल मिडिया परिषद अध्यक्षा विनय सोनवणे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे यांच्यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मिडिया परिषद पिंपरी चिंचवड चे सदस्य व पदाधिकारी तसेच प्रत्यक्ष सक्रीय पत्रकार महावीर जाधव, सिद्धांत चौधरी, संतोष गोतावळे, संभाजी बारबोले, रोहित जाधव, अशोक कोकणे, दत्ता कांबळे, नरेश जीवनाल, हनुमंत रामदासी, सीता जगताप इत्यादी पत्रकार उपस्थित होते. तसेच विविध संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?