Home पिंपरी चिंचवड एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा

संयुक्त पाहणीद्वारे बुजविलेले व अतिक्रमित नाले ओळखून आवश्यक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

पिंपरी,(दिनांक १३ एप्रिल २०२६) – एमआयडीसी परिसरातील नाल्यांवर झालेले अतिक्रमण आणि बुजविण्याच्या प्रकारांमुळे नैसर्गिक जलप्रवाह बाधित होत असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे एमआयडीसी व महापालिका अधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून अतिक्रमित व बुजविलेले नाले तात्काळ ओळखून आवश्यक ती कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी शक्य आहे तेथे नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करावी किंवा पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरातील नाल्यांची सद्यस्थिती, त्यावरील अतिक्रमणे तसेच पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात महत्त्वपूर्ण बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस एमआयडीसीच्या विभागीय अधिकारी अर्चना पठारे, उप आयुक्त अण्णा बोदडे, प्रदीप ठेंगल, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय कोतावाड, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड, अजिंक्य येळे, अतुल पाटील, पूजा दुधनाळे, निवेदिता घार्गे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान एमआयडीसी परिसरातील जलनिस्सारण व्यवस्थेचे सध्याचे स्वरूप, अडथळे आणि त्यावरील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, शहरातील एमआयडीसी परिसरात जुन्या नकाशांमध्ये दर्शविलेले अनेक नाले कंपन्यांकडून बुजविण्यात आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणांमुळे नैसर्गिक जलप्रवाह अडथळित होत असून, पावसाळ्यात पाणी साचणे, पूरस्थिती निर्माण होणे आणि उद्योग तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

banner

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी आणि संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त पाहणी करून एमआयडीसी परिसरातील बुजविलेले किंवा अतिक्रमित नाले तसेच पाणी साचणारी ठिकाणे तात्काळ ओळखून त्यांची नोंद घेण्यात यावी. शिवाय, जुन्या नाल्यांची मूळ रचना पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामे हाती घेणे गरजेचे असून, ज्या ठिकाणी ते शक्य नाही तेथे पर्यायी स्वरूपात स्टॉर्म वॉटर लाईन टाकण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.

तसेच, जलनिस्सारण मार्गांवर अतिक्रमण करणे ही गंभीर बाब असून यामुळे संपूर्ण परिसराच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. नाल्यांवर अतिक्रमण केलेल्या किंवा नाले बुजविलेल्या कंपन्यांनी अतिक्रमण काढून नाले पूर्वस्थितीत आणण्याबाबत कळविण्यात यावे. तसेच आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि वेळेत काम करण्याचे निर्देशही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?