Home शिरूरमहाराष्ट्र आळंदी परिसरात अवकाळी पावसाने झुडपलं नागरिकांची निवाऱ्यास धावपळ

आळंदी परिसरात अवकाळी पावसाने झुडपलं नागरिकांची निवाऱ्यास धावपळ

by swarajyanewsmajha@gmail.com
0 comments

आळंदी प्रतिनिधी दिनांक (३० मार्च २०२६) आळंदी पंचक्रोशीत हलका ते माध्यम स्वरूपाचा अचानक अवकाळी पाऊस झाला. या वेळी झालेल्या पावसांत भाविक, नागरिकांची तारांबळ झाली. माउली मंद्र परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी वाहून आले. यात परिसरातील धुळीचे साम्राज्य झालेल्या पावसाने पावसाच्या पाण्याने पुढे वाहून पायऱ्यावरून गाळ युक्त पावसाचे पाणी वाहून गेले.
या वेळी परिसरातील वेळचणीला भाविक, नागरिकांनी आसरा शोधला. सुमारे अर्धातास झालेल्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले. प्रदक्षिणा मार्गावरील खड्यांचे ठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहन चालकांना मोठा सामना करावा लागत होता खड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात गाडी आदळत पुढे काढावी लागली. येथील श्री विठ्ठल रुख्मिणी चौकातील पेव्हर ब्लॉक खचल्याने वाहन चालकांसह पादचाऱ्याना देखील रस्त्याचे खदत्यातील अंदाज न आल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागले.

आळंदी परिसरात आल्हाददायक वातावरणात हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस येत असल्याचा अंदाज येताच शेतक-यांनी आपापल्या शेतात कामे उरकण्याची लगबग केली. आळंदी वडगाव रस्त्यावरील ज्ञानसागर मंगल कार्यालया जवळील विद्युत डी.पी. जळाल्याने काही वेळ आळंदीतील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वाढत्या संकटांनी बळीराजा खचला असून ख-या अर्थाने उभारी देण्यासाठी
शेतक-यांचा सात बारा कोरा करण्यासाठी शेतकरी बांधवाना राजाश्रयाची गरज असल्याचे शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गाडेकर यांनी सांगितले. जो पर्यंत शेतकरी कर्ज मुक्त होत नाही तो पर्यंत बळीराजा सुखी होणार नाही. तात्काळ राज्य व केंद्र सरकार यांनी महाराष्ट्रातील शेतकरी कर्ज मुक्त करून शेतमाल उत्पादक शेतक-यांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्य शासनाकडून बळीराजाला न्याय मिळेल अशी आशा धरून शेतकरी टक लावून मदतीच्या प्रतिक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण कमी करून नदी बार माही वाहती ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे. आळंदी शिव रस्त्या वर विकास कामे सुरु आहेत. मात्र पावसाचे पाण्याने रहदारीला गैरसोयीचे झाले. परिसरातील पाण्याचा निचरा,सांडपाणी योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यास प्राधान्य देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.

You may also like

Leave a Comment

Edtior's Picks

Latest Articles

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन. पिंपरी चिंचवड (दिनांक १४ एप्रिल २०२६) डॉ. आंबेडकरांनी भारतात आणि परदेशात आपले शिक्षण पूर्ण करून शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवले. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदव्या मिळवल्या, तसेच ६४ हून अधिक विषय आणि ११ भाषांवर प्रभुत्व प्राप्त केले—जे त्यांच्या काळातील एक अतुलनीय विद्वत्तापूर्ण यश होते. डॉ. आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य शोषित वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून, त्यांनी भारतीय राज्यघटनेला आकार देण्यात, मूलभूत हक्कांची हमी देण्यात आणि लोकशाहीचा पाया घालण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून त्यांचे योगदान कायद्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांनी लैंगिक समानता, कामगार सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाचा पुरस्कार केला. १९९० मध्ये, राष्ट्रासाठी केलेल्या त्यांच्या अफाट सेवेचा गौरव म्हणून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला. डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले की ज्ञान हेच खरे सक्षमीकरण आहे आणि प्रत्येक व्यक्ती, तिची पार्श्वभूमी काहीही असली तरी, सन्मानास पात्र आहे. समानता, न्याय आणि सर्वांप्रति आदर यावर आधारित समाजाचे त्यांचे ध्येय आपण पुढे नेऊया. असे निरूपण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील स्मारक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात देखील शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगरसेवक ॲड.गोरक्ष लोखंडे म्हणाले, आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी राज्यघटनेत ज्या विशेष तरतुदी केल्या, त्यामुळे अस्पृश्यांच्या हक्कांना घटनात्मक वैधता प्राप्त झाली. भारत सरकारच्या विविध समाजकल्याणकारी योजनांचे मोठे श्रेय आंबेडकरांच्या कार्यास जाते. हिंदू कोड बिलात सुचवलेल्या उपाययोजना पुढे कायद्याच्या रूपाने अमलात आल्या. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढून शिक्षण, संघटना आणि संघर्षाचा मंत्र दिला. त्यांनी अस्पृश्यता निवारण, महिला हक्क आणि शोषितांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांचे विचार आजही तरुण पिढीला प्रेरणा देत राहतील. तसेच सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, विजय लोखंडे, मा. नगरसेवक पंडीत गवळी,ॲड गोरक्ष लोखंडे, प्रकांश सोमवंशी, राजेंद्र जगताप, शेखर चिंचवडे, नगरसेविका वर्षा जगताप, योगिता बारणे, प्रदेश ओबीसी कार्याध्यक्ष ॲड. सचिन औटे, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, अकबर मुल्ला, उपाध्यक्ष शक्रुल्ला पठाण, कुमार कांबळे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, संभाजी बारणे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, महिला उपाध्यक्षा भाग्यश्री मस्के, सरचिटणीस नीलम कदम, देवी थोरात, राजू चांदणे, सुरेंद्र सिंग बाला, चंदू हलगी, समीर थोरात, महेंद्र तापकीर, अभिजीत आल्हाट, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इ. पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?